Saturday, September 26, 2009

लहानपण देगा देवा..

लहानपण देगा देवा..
शाळेत असताना वाटायचं..कॉलेज मधे कधी जाणार..कॉलेज मधे किती मजा असते...गाडी मिलते..फ़क्त १च वही/ पुस्तक घेउन जायचं..जास्त अभ्यास नाही...खुप खूप मजा करायची..
कॉलेज मधे गेल्यावर वाटायचं..यारर..नोकरी कधी लागणार..इतकं शिकलोयं त्याचा फ़ायदा काय ज़र जॉब नाही मिळाला तर!!
नोकरी लागल्यावर कळतं..पैसा कमावनं काही सोपी गोष्ट नाहिए..बॉस च्या एक्सपेक्टेशन्स..कामाचा प्रेशर..उफ़फ्फ़...
खरचं आपण लहानपणी किती सुखी होतो!!
संत तुकारामांनी खरचं म्हटलय.."लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा"
कित्त्त्त्ती सुख होतं लहाणपणी..जास्त अभ्यास नाही..आई,बाबा,आजी,मामा सगळे जण लाड करणार..
कोणतीही गोष्टं हट्ट केला की मिळायची..मनसोक्तं खेळलं तरी आई जास्त रागवत नव्ह्ती..
खेलीमेलीच्या वातावारणतली स्पर्धा असायची..अभ्यास असो की दूसरं काही..
सगळ्या स्पर्धांमधे भाग घेऊन सुद्धा अभ्यासाचा वेळ वाया जायचा नाही..
सगळं करायला मिळायचं आणि ऑटोमॅटिकली सर्वांगीण विकास व्हायचा!!
2महीने उन्हाळ्याची सुट्टी, 15दिवस दीवाळीची सुट्टी मिळायची :-)
आता तर वीकेंड मिलतो तो पण कामं करण्यात कसा संपतो ते कलत नाही :'-(
कधी घरात लग्न-समारंभ असला की सुट्टी मिलायची मग सगळं सोडून फकत
भाउ-बहीनिंसोबत धम्माल करायची!!
टीव्ही होता पण 1000 चॅनेल्स नव्ह्ते..त्यामुळे इनडोर, आउटडोर गेम्स खेळायला फुल स्कोप होता..
कोणत्याच कारणासाठी शीकवणी लावायाची गरज नव्हती..
आई, बाबा नाहीतर ताई अभ्यास घ्यायची आणी दादा लोकं तर होतेच गेम्स शिकवायला...
कधी शालेत जायचा कंटाळा आला तर खोटं खोटं आजारी पड़ून घरी बस्ता येत होता..
घरी आई आणी शालेत बाई अड्जस्ट करून घ्यायच्या..आता ऑफीस मधे कोन ऐकतय???!!!!

काश...ते दिवस पुन्हा परत आले तर कीत्ति बरं होइल....

पण जसा काळ बदलला आहे तसं लहानपणाच्या सुखात पण बदल झाला आहे..
आज लहान बाळ जेमतेम 2.5 वर्षाचं होत नाही की सुरू होते तयारी त्याच्या इंटरव्यू ची..के.जी.साठी!!!
म लकी की मला डायरेक्ट पी.जी. साठीच इंटरव्यू दयावा लागला..
के.जी. झाला की मग थोडं पूढच्या वर्गात गेल्यावर कंपल्सरी ENGLISH मीडियम च्या आई, बाबांच्या हट्टामुळे त्या बाळाला ट्युशंस ला टाकनार..
घरी आजी, आजोबा तर नसतातच पण आई,बाबा पण नसतात..मग BEST FRIEND IS TV!!!
मैदानी खेल आसू देत की कुठलं वाद्य शिकायच असेल तर लावा क्लास..
कारण आई,बाबाना वेलच नाहीए आणी "हम २ हमारा १" मुळे ताई, दादा पण गायब झाले आहेत..
आई,बाबाना ज़र मातृभाषेतली पुस्तकं वाचायची सवय असेल तरच मूलाना कलतं की मराठी बुक्स पण वाचनिय असतात..
घरात टीव्ही विथ 1000 चॅनेल्स तर असतातच पण कंप्यूटर विथ नेट पण आसतो त्यामुळे मुलं जास्त करून कंप्यूटर गेम्स खेलत असतात..मग डोळ्यांवर लहान वयातचं चष्मा लागतो..
शाळा तर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ईतका अभ्यास देते की त्या दप्तराचं ओझं वाहता वाहता लहानपणीच त्यांना पाठदुखिचा त्रास सुरू झालाय की काय अशी भिति वाटते!!

एक ना अनेक अशा किती गोष्टी बदलल्या आहेत..

हे सगळं बघून वाटतं "लहानपणीचा तरी काळ सुखाचा राहिलाय का??!!!' :-(


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check