Thursday, December 31, 2015

मुली बदलल्या आहेत आरपार!!

संगीता अरबुने यांची हि कविता मी आणि माझ्या जनरेशनच्या असंख्य मुलींच्या वागणुकीचा खरा अर्थ सांगणारी आहे.

कवितेमधे वर्णिलेल्या सर्व गोष्टी एक मुलगी म्हणून पिढी दर पिढी तशाच केल्या गेल्या पाहिजेत ह्या अट्टहासामधून बाहेर निघणारी माझी पिढी प्रत्येक वेळेस 'का करायचं फक्त आम्हीच हे?' विचारत राहिली आणि मोठे लोक,'हे असं केलंच पाहिजे' इतकच काय ते उत्तर देऊ शकले.

पण हि कविता त्या सगळ्यांना ठणकावून सांगत आहे की आम्ही जे नाकारलं ते नेमकं कशाकरता.

लहानपणापासून आम्हांला सक्षम बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले आणि जेंव्हा आगीत उडी घेऊन तावून सुलाखून बाहेर यायची वेळ आली नेमकं तेंव्हाच पूर्वापार चालत आलेल्या रूढींच्या बेड्यांनी जखडून टाकायचा प्रयत्न केला गेला!! पण नाही, इतकं सोपं नाही ते..कारण तुम्हीच दिलेली उर्जा आम्हांला ह्या बंधनांना तोडून पुढे जायचं सामर्थ्य देत आहे.

Tuesday, December 29, 2015

अक्कल

गेले काहि दिवस माझ्या आॅफिस आवारामधे कुत्र्याची ४-५ पिल्लं हिंडत आहेत. मी जमेल तसं त्यांना खायला घालते. काल असंच मी त्यांच्यासाठी कॅन्टीनमधून दूध आणलं आणि ताटली मधे प्यायला ठेवलं. तीनही पिल्लांनी चटचट आवाज करत दूध संपवलं म्हणून मी अजून दिलं पण त्यातल्या एकानेच तितकं संपवलं आणि मी परत ताटलीमधे दूध ओतेपर्यंत तिघेही तिथून बाजूला झाले आणि खेळायच्या पवित्र्यामधे माझ्याकडे बघत शेपूट हलवत उभे राहिले :)

एव्हढासा जीव आहे त्यांचा पण त्यांना पण कळतं की जितकं पोटाला गरजेचं आहे तितकचं खावं. मी असं पण ऐकलंय की सिंहाचं पोट भरलेलं असेल तर समोरून सावज जरी गेलं तरी तो काहिही करत नाही. बहुतेक तरी एक मानवप्राणी सोडला तर बाकी सगळ्यांना कळतं की पोटाला आवश्यक तितकचं अन्न खावं!!

विरोधाभास बघा, माणसाला अन्नाची चव कळते, बाकी प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी आहे त्यामुळे एकावेळी किती खावं-काय खावं हेही कळतं पण नाही आम्हाला अन्न वाया घालवायचंच असतं!!
अगदी रोज न-चुकता आमच्या कॅन्टीनमधे किलोने अन्न वाया गेलेलं दिसतं.आमच्या इथे काही स्वस्तात वगैरे जेवण मिळत नाही पण तरी लोक ताट ओसंडून जाइपर्यंत वाढून घेतात आणि मग नाही आवडलं किंवा पोट भरलं की सरळ ताट नेऊन टाकतात.

आॅफिस कॅन्टीन असू देत किंवा हाॅटेल, ताटातलं अन्न टाकून देण्याबाबत परिस्थिती सारखीच आहे!!

लग्न समारंभ किंवा आॅफिस पार्टी असेल तर मग काय विचारायलाच नको! अगदी भरजरी कपडे,दागदागिने घालून नटून-थटून आलेलं पब्लिक कधी न-मिळाल्यासारखं खायला घेतात आणि ताटात अन्न टाकून देतात. तुम्ही ह्याकरता बुफे पद्धत ठेवा नाहीतर वाढपी, लोक कशालाच जुमानत नाहीत!!

ह्यावर उपाय म्हणून असेल कदाचित पण पुण्यातल्या जुन्या काही हाॅटेलांमधे मी एक पाटी वाचली आहे-'ताटात अन्न टाकल्यास जादा पैसे आकारण्यात येतील', ह्या नियमाचं पालन खरंच कितपत काटेकोरपणे केलं जातं माहित नाही :(

मला कळत नाही की नेमकं काय कारण असू शकतं असं अन्न वाया घालवण्यामागे? तुम्ही पैसे देऊन अन्न विकत घेता म्हणून तुम्हाला ते फेकून देण्याचा हक्क मिळतो का? की अन्न फेकणं ही मोठी मर्दानगीची गोष्ट आहे??

हल्ली फेसबुकवर बरेच फोटोज येतात ज्यामधे, अन्न बनवायला किती प्रक्रिया करावी लागते आणि किती सहजतेने ते फेकलं जातं, ह्याबाबतीत जागरूकता करायचा प्रयत्न केला गेला आहे. लोक सवयीप्रमाणे ती पोस्ट पण न-वाचता किंवा नुसतंच बघून लगेच आपापल्या वाॅलवर शेअर करतात पण प्रत्यक्षात जेवतांना कितपत त्यांच्या लक्षात राहतं देव जाणे!!

मी जेंव्हा स्वयंपाक करायला शिकले तेंव्हा त्यात किती कष्ट असतात ह्याची जाणिव झाली आणि ताटात अन्न न-टाकण्याची लहानपणापासून असलेली सवय किती महत्त्वाची आहे हे जाणवलं.मुळात जेवायला घेतांना ताटामधे अन्न कमीच वाढून घेतलं की, चव आवडली नाही म्हणून फेकून देण्याची वेळच येणार नाही ना!!

माझी ही पोस्ट वाचून लाईक-शेअर नाही केलं तरी चालेल पण शक्यतो प्रत्यक्षात अन्नाची नासाडी करू नका आणि दुस-यांनाही करण्यापासून परावृत्त करा.

Sunday, December 13, 2015

लाल डबा

लाल डब्याने प्रवास करणं जितकं त्रासदायक तितकचं एन्टरटेनींग पण असू शकतं ह्याचा अनुभव आज ब-याच दिवसांनी घेत आहे.

बसमधे गर्दी आहे, बरेचसे लोक उभ्याने प्रवास करत आहेत.माझ्यासमोर च्या सीटवर बसलेले एक म्हातारे बाबा एकदम रंगात आले आहेत.कदाचित रोजची त्यांची ही 'घेउन' बडबड करायची वेळ असावी पण आज प्रवास करत असल्यामुळे ते बाबा बहुतेक फक्त बडबडीवरच भागवत आहेत.त्यांच्या बायकोने एव्हाना २-३ वेळेस अगदी 'हळूवार'पणे सौम्य शब्दात त्यांना दम दिला आहे पण अजून तरी म्हणावा तसा परिणाम दिसत नाही.:D

मागच्या रांगेमधे कोणीतरी बाई फोनवर कुठल्यातरी अगम्य भाषेमधे पण खरपूस टोनमधे समोरच्याचा समाचार घेत आहे. जवळपास १५मिनीटे ती बाई सतत बोलत आहे :D :D :D

कोणी कोणी फोनवर जोरजोरात बोलत आहेत तर कोणाचं पोर रडगाणं आळवतंय :D :D

आणि उरली सुरली जनता कानामधे हेडफोन कोंबून ह्या सगळ्या आनंदाला मुकत आहे,असो.

खिडकीच्या बाहेर निळसर-काळी रात्र सगळ्या सृष्टीला आपल्या कवेत घेत थंडीची पखरण करत पुढे सरकत आहे..

आणि चंद्रकोर..काळ्याभोर आकाशात नाजुकशी चंद्रकोर उगवलेली आहे..रस्त्यावरच्या डोळे दिपवणा-या प्रखर प्रकाशापुढे फारच विलोभनीय,नाजूक आणि सुंदर दिसत आहे :) :)

Thursday, December 10, 2015

अंधा कानून

आत्ता NDTV चॅनेलवर बरीच गहन चर्चा चालू आहे ज्यामधे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपापली मतं अगदी जोर देऊन सांगत आहेत.कोणी म्हणतंय की पैसा आहे म्हणून स**न खा* ने चांगला वकील केला अगदी हुशार मंडळींना वापरून स्वतःसाठी न्याय मिळवून घेतला. एकजन आजचा निर्णय देणा-या हायकोर्टाच्या जजला वाईट ठरवत आहे आणि एक जन स**न खा* कसा चांगला, त्याने किती चांगली कामं केली वगैरे चा पाढा वाचत आहे.

ह्या सगळ्या प्रकरणामधे नेमकं कोण दोषी?

NDTV चॅनेलच्या चर्चेनुसार तर मुंबई पोलिस दोषी कारण त्यांनी तपास निट नाही केला आणि म्हणून निर्णय हा लागला.

खरं तर नेमकं काय घडलं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळणं अत्यंत कठीण आहे कारण मिडीयाने जे आपल्याला सांगितलं तेच अापण बघितलं,ऐकलं आणि त्यानुसार चर्चा करून स**न खा* ला दोषी ठरवलं.

दोषी नेमकं कोण? कोणीही नाही सांगू शकत. आज १३वर्ष झाले पण ह्या केसचा निर्णय शेवटी लागलाच नाही, कारण त्या फुटपाथवर झोपलेल्या माणसाला मारलं कोणी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला ना!!

खरंच 'अपने देश का कानून अंधा है क्या?'

Saturday, November 28, 2015

धुकंच धुकं :) :) :)

आज कोथरुडमधे सूर्योबाचं पहिलं किरण ८.४५मिनीटाने दिसलं तरी पण धुक्याचं वलय आहेच :) काय वर्णावी आजची सकाळ..अहाहा धुकंच धुकं :) :) :) :) समोरची इमारत स्पष्टपणे दिसत नव्हती इतकं धुकं :) :) खिडकी उघडली तर घरामधे भरभर शिरून खोलीतसुद्धा धुकं :D :D :D सवयीप्रमाणे मी टेकडीवर जायला निघाले तर बाहेरही दाट धुक्याची चादर होती.जणू ढग उतरून जमिनीवर अंथरले आहेत असंच वाटत होतं.त्या ढगांधून वाट काढत काढत टेकडीवर पोहोचले, तिथे तर पांढ-याशुभ्र ढगांची गर्दीच झालेली दिसली :D :D :D धुकं जरी दाट होतं तरी अगदी उबदार वाटत होतं,थंडीचा मागमूसही नाही :) :) :) जवळपास तासाभराने थोडी हवा जाणवायला लागली आणि धुक्याचे पुंजके जरा विरळ व्हायला लागले.मग हळूहळू पूर्व दिशेला गोल-गरगरीत अगदी भाकरीसारखा पांढराशुभ्र एक गोळा दिसायला लागला तो सूर्योबा होता :D :D :D :D बिचारा अगदीच केविलवाणा वाटत होता, ढगांच्या दुलईने त्याचं तेज जणू शोषून टाकलं होतं.. आत्ता जवळजवळ दोन तासाने सूर्योबा आपला तेजोमय अंगरखा घालून अवतरला आहे :) :) :) खरंच फार वेगळा आणि सुखद अनुभव होता आजच्या उबदार ढगांच्या सहवासाचा :) :) :)

Wednesday, November 25, 2015

संस्कार

काल माझ्या सोसायटी मधे राहणारी दोन शाळकरी मुलं आली होती. त्यांच्या शाळेमधे रेनवाॅटर हार्वेस्टिंग चा प्रोजेक्ट करणार आहेत त्याकरता त्यांना पैसे गोळा करायला सांगितलं आहे. ती मुलं कुपन्स घेऊन आली होती आणि जेंव्हा लकी-ड्राॅ होईल तेंव्हा तुम्हाला कदाचित बक्षिस लागू शकतं. मी ते कुपन्स घेतले आणि मला माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवल्या :) :) :)

आमच्या शाळेमधे आम्हांला असंच एक काम दिलं जायचं.प्रत्येकाला एक कागद देऊन सांगितलं जायचं की एक आठवडाभर तुम्ही शेजारी-पाजारी राहणा-या काका,काकूंना मदत करायची आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यासाठी १रू.,२रू किंवा ५रू. घ्यायचे.

इयत्ता ४ किंवा ५वी मधे असतांना बहुतेक हे केलं असावं मी. आजकालच्या शाळांमधे असे उपक्रम होतात की नाही मला माहित नाही.

पैसे मिळावे ह्याकरता दुस-यांना मदत करावी ह्याहीपेक्षा दुस-यांना मदत करण्यात खूप छान वाटतं ही भावना त्या वयात रूजली गेली.:) :)

असाच एक अजून महत्त्वपूर्ण संस्कार शाळेने आमच्यावर केला - आर.डी.

इयत्ता ५वी पासून ते १०वी पर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम पोस्टात ठेवायची.आमच्या शाळेमधेच एक बाई हे काम करायच्या.खूप साधी गोष्ट होती ही, पण प्रत्येकाने बचत केलीच पाहिजे हा संस्कार तेंव्हा मनावर बिंबवला गेला :) :) :)

अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून शाळकरी वयात जे काही शिकवलं गेलं ते आज फार महत्त्वाचं ठरतंय.:) :) :)


Monday, November 23, 2015

एल.आय.सी.

आज पुण्यात कोसळणा-या पावसाने रस्त्यांना नद्यांचं रूप दिलंय. अशा पावसामधे सुखात घरी बसून वाफाळेल्या काॅफीचा सुगंध अनुभवण्याच्या ऐवजी मी हिंजेवाडी मधून निघून थेट स्वारगेटला पोहोचले वेळ अर्थातच दोन तास लागला आणि त्यामुळे एक गम्मत झाली.

एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स आॅफिसमधे मला एक चेक जमा करायचा होता पण उशीर झाला. थोडा नाही तर तब्बल एक तास उशीर झाला. मुसळधार पाऊस कोसळतच होता पण त्यातून वाट काढत एकदाची आत पोहोचले. रिसेप्शन काऊंटरला पोहोचले तेंव्हा नखशिखांत भिजलेली होते.

तिथे एक मॅडम बसल्या होत्या May I Help You? असा गोंडस सवाल करणारा बोर्ड घेउन. मी त्यांना माझा चेक दाखवणार तितक्यात त्यांनी नजरही वर न-करता मला सांगितलं काउंटर बंद झाला आहे मी चेक घेणार नाही. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी तोंड फुगवून परत तेच वाक्य माझ्यावर फेकलं!!

मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली की मी कित्त्ती दुरूssन आले होते तेही अशा पावसात पण अंहं बाई एकदम ढिम्म!!

मग माझा सौजन्यपूर्ण आवाज चढला आणि पुढच्या काऊंटर कडे वळून इथे मुख्य साहेब कोण म्हणून विचारलं तर त्यांनी मला विचारलं की काय काम आहे. मग मी चेक दाखवून 'जमा करून घेता का प्लीज' असं विनवलं. त्यांनी एका दुस-या मॅडमला विचारलं आणि मला सोपा पर्याय दिला. पाचएक मिनिटात माझं काम झालं पण :)

पण तितक्यात एका माणसाचा आवाज आला तोही माझ्यासारखा एक लाचार कस्टमर होता एल.आय.सी. चा आणि त्यालाही असंच 'वेळ संपली.उद्या या' उत्तर तोंडावर मारलं गेलं होतं. त्याने आवाज चढवल्यावर मगासच्याच मॅडम ज्यांनी मला मदत केली त्यांनी त्यालाही मदत केली.

एल.आय.सी. च्या आॅफिसमधे मला कायम असाच विचित्र अनुभव आला आहे आजवर!! कायम तुच्छतेने बोलणारे लोक, काहिही मदत मागितली तरी को-या चेह-याने आणि निर्लज्जपणे छापील उत्तरं तोंडावर मारणार.म्हणजे समोरचा माणूस मूर्ख आहे आणि त्याला मदत न-करणं हेच त्यांचं तिथल्या खुर्चीवर बसून करायचं एकमेव काम आहे!!

त्यामुळेच आज माझं काम झालं तेंव्हा मी ठरवलं आणि ब्रँच मॅनेजरला भेटायला गेले.त्या माणसाला मी फक्त इतकंच सांगायला गेले होते की समोरच्या माणसाचं निदान आधी ऐकून घ्या आणि मग तुमचे नियम सांगा ना, तर तो माणूस लगेच आवाज चढवून ओरडायलाच लागला. मग लक्षात आलं की ह्या माणसाशी बोलण्यात अजिब्बातच अर्थ नाही!!

ह्या लोकांना फीडबॅक चा अर्थच नाही समजत काय करणार,असो,शेवटी मी तिथून बाहेर पडले मला मदत केलेल्या मॅडमना मोठ्ठं थँक्यू म्हणून :)

अशा प्रसंगांमुळे सरकारी आणि खाजगी संस्थाकडून मिळणा-या सेवेबाबतचा फरक परत एकदा तीव्रतेने जाणवला :(


Saturday, November 21, 2015

फॅन

ब-याच दिवसांनी शनिवारची सकाळ अनुभवायला मिळाली.

टेकडीवर जाऊन बसले पण सूर्योबाचं आगमन झालं नव्हतं. रोजच्या मानाने आज जरा उशीर होतोय असं वाटलं.आकाशात ढग दिसत होते अजूनही पण थंडीच्या मोसमाची बोचरी हवा नव्हती.सगळं वातावरण अगदी शांत, स्तब्ध..भवतालचा निसर्ग एका मंद लयीत श्वास घेत होता.

पाच-एक मिनिटात पूर्वेकडेची करडी छटा जरा उजळल्यासारखी झाली आणि दाट ढगांच्या दुलयीआडून एक छोटुसा किरण बाहेर आला :) :) मग पांघरून थोडंसं बाजूला करून गुलाबी-लालसर गोळा वरती डोकावला..पण आज दुलईतून बाहेर येण्याची इच्छा दिसत नव्हती सूर्योबांची मग काय परत ढगाआड लपून बसले :D :D पण दुस-याच क्षणी जणू जादू झाली आणि ढगांचं आवरण पूर्णतः बाजूला होऊन लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला..बहुतेक सूर्योबाच्या आईने फॅन बंद केला होता ;) :D :D

Tuesday, August 18, 2015

डबल सीट

ट्रेलर जेंव्हा बघितलं ना तेंव्हाच ठरवलं होतं की हा सिनेमा बघायचाच!!

दिग्दर्शक समीर विद्वांस आणि कलाकार मुक्ता बर्वे, अंकुश चौधरी,वंदना गुप्ते आणि विद्याधर जोशी अशी दिग्गज मंडळी जेंव्हा एकत्र येत आहेत तेंव्हा नक्कीच काहीतरी दर्जेदार बघायला मिळणार ही खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणेच झालं.

अतिशय साध्या माणसांची अगदी साधी पण ह्रदयाला भिडणारी गोष्ट आहे ही.

चित्रपटाची कथा मंजिरी आणि अमित ह्या नवविवाहित जोडप्याच्या अवती-भवती फिरते.मुंबईच्या चाळीमधलं जीवन, त्यात मंजिरीची होणारी फरफट आणि ते बघून अमितची होणारी चिडचिड हे सगळं अतिशय योग्यरीत्या दाखवलं आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबाकरता स्वतःचं घर मुंबई सारख्या ठिकाणी असणं हे खरंच अत्यंत अवघड स्वप्न आहे पण, जर जिद्द असेल आणि अविरत कष्ट करायची तयारी असेल तर हे अशक्य वाटणारं स्वप्नसुध्दा सत्यात उतरवता येतं हेच ह्या चित्रपटातून आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे.

मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी ह्या दोघांचा अभिनय अप्रतिम आहे.चेह-यावरचे,डोळ्यातले हावभाव इतके बोलके आहेत की संवादाचीसुद्धा गरज नाही पडत.

नरीमन पाॅईंटला फेसाळलेला समुद्र बघून उत्साहात बोलणारी मंजिरी, सास-याच्या 'चहा'ची अवेळी आलेली डिमांड न-नाकारता पण चेह-यावर स्पष्ट नाराजी दाखविणारी मंजिरी, बाळाची चाहूल लागल्यावर अमितला पहिल्यांदा सांगताना डोळ्यात हजारो स्वप्न असणारी मंजिरी आणि पतसंस्थेत झालेल्या घोळाने त्यांच्या स्वप्नाचा झालेला चुराडा कणखरपणे झेलणारी मंजिरी..एक कसलेला कलाकारच ह्या सगळ्या छटा इतक्या ताकदीने पण तितक्याच सहजतेने आपल्यासमोर मांडू शकतो.

मुक्ता बर्वे च्या तोडीस-तोड अभिनय अंकुश चौधरींचा आहे.दोघांची आॅन-स्क्रीन केमिस्ट्री अगदी भारी आहे. :)

ह्या दोन महत्त्वाच्या पात्रांव्यतिरिक्त अजून एका कलाकाराचा अभिनय आपल्या मनावर ठसा उमटवून जातो ते म्हणजे विद्याधर जोशी! आयुष्यात कुठलीच स्वप्न बघायचा प्रयत्नही न-केलेला एक माणूस आणि मुलाने स्वप्नपूर्ती साठी केलेली धडपड बघून विरघळेला बाप अप्रतिमरीत्या उभा केला आहे.

वंदना गुप्तेजींचा सहज-सुंदर अभिनय ह्या चित्राला पूर्णत्व देणारा आहे.

सगळ्यात जास्त कौतुक करायला हवं ते दिग्दर्शकाचं.प्रत्येक प्रसंग, त्यासाठीचे संवाद, कलाकारांचे हावभाव, प्रसंगासाठी निवडलेली जागा अगदी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे.सुरुवातीपासून शेवटापर्यंत पूर्ण कथेला व्यवस्थित बांधलंय..एकदम बाप सिनेमा बनवलाय

Saturday, August 15, 2015

गोची

हां तर मंडळी आज आपल्या देशाचा हॅप्पी बड्डे आहे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बरंका :)

तर बघा आजपासनू चालू झालाय श्रावण महिना!!

साजिरा-गोजिरा श्रावण आला..ऊन-पावसाचा खेळ घेउन आला वगैरे ठीक आहे पण हाच गोजिरा श्रावण एका खास वर्गाची गोची करणार आहे दरवर्षीप्रमाणे :D

गोची कशी तर आता काही लोकांना महिनाभर..'महिनाभर' बरंका! हं म्हणजे पार श्रावण संपेपर्यंत.. सामिष म्हणजे नाॅन-व्हेज खाता येणार नाही!!!

'हम्म', 'होना यार', 'कटकट ए चा***' - ऐकू आले का तुम्हाला हे दु:खद सुस्कारे ;)

काल नाॅन-व्हेज खायचा शेवटचा दिवस म्हणून पोट फुटेस्तोवर खाल्लं पण समाधान होत नाही हो, नाॅन-व्हेज चीजही ऐसी है जो खाए वही जानता है इसकी जादू..हम्म कळ्ळं बरं!

बहुतेक जणांच्या घरामधे ह्या महिन्यामधे सामिष अन्न शिजवलं जात नाही आणि मग 'आई' किंवा क्वचित काही घरात 'बायको'ने सांगितलं म्हणून ह्या गोष्टीचं पालन करायचं अवघड-अशक्यप्राय असं काम काहीजणांच्या नशिबी येतं..कित्ती कित्ती ते कष्ट :p

मग अशी जनता अगदी रोज न-चुकता जेवणाच्या वेळी ह्या दु:खाची उजळणी करत उगाच काहीतरी व्हेज पाला चघळत वेळ मारून नेते!!

पण काही कमजोर दिल असतात जे हा विरह सहन करु न-शकल्यामुळे 'एखादा दिवस चालतं रे', 'बाहेर चालतं रे', 'आॅफिसमधे खाल्लेलं आई/बायकोला जाऊन कोण सांगणार आहे','आपण अजून लहान अाहे रे चालतं आपल्याला' अशा विविध क्लुप्त्या लढवत एखादा दिवस हात मारतातच!!

गम्मत आहे की नाही :D म्हणजे बघा, ह्या बहाद्दरांना कुठलंही कारण जरी दिलं म्हणजे सायंटिफिक वगैरे तरी काही फरक पडत नाही मग कशाला ते आज्ञाधारक बनून उगाच श्रावण पाळण्याचा आव आणायचा :|

मी असं ऎकलंय की जर उपवास केला आणि तुमच्या मनात नुसती उपवासाच्या पदार्थाव्यतिरीक्त काही वेगळं खायची इच्छा जरी झाली नं तरी उपवास मोडतो म्हणे मग इथे तर नाॅन-व्हेज खाण्याची गोष्ट अाहे!!

नाही तुम्हाला इच्छा तर जाऊ देत ना कशाला उगाच मन मारायचं.जमत नसेल श्रावण पाळायला तर ठेवा ना हिम्मत तुम्हाला शपथा घालणा-यांना स्पष्टपणे सांगण्याची!! पण तिथेच तर गोम आहे सगळी :D सांगूही शकत नाही आणि खायची इच्छाही मारु शकत नाही :)

तर अशा कात्रीत सापडलेल्यांनो आणि न-सापडलेल्यांनो तुम्हा सर्वांना ह्या साजि-या-गोजि-या श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा :) :) :)


Friday, August 14, 2015

पावसाळा

यार हा पावसाळा इतका सुंदर का असतो आणि आॅफिस इतकं बोरिंग!!

आज तर मौसम लाजवाब आहे :) असं वाटतं की मस्त भटकायला जावं रानोमाळ..दूरपर्यंत फक्त हिरवाई आणि हलकासा पाऊस..कानाशी खेळणा-या वा-याचा हलकासा आवाज पण बाकी सगळीकडे शांतता भरून राहिलेली..डोंगरांवर धुक्याची दाटी..जमिनीवर हिरव्या रंगाच्या असंख्य छटा कदाचित कलर पॅलेटमध्ये मधे इतके शेड्स आपल्याला बनवता पण येणार नाहीत..

डोळे अधीर होऊन सगळा नजारा पित आहेत आणि शरीर अगदी पिसासारखं हलकं झालंय..रोजच्या कोलाहलापेक्षा खूप दूर पण निसर्गाच्या खूप जवळ..आतपर्यंत तो निसर्ग, ती हिरवाई, तो पाऊस हलके हलके झिरपत राहतो..

Thursday, August 13, 2015

एच.आर.

सकाळी धावत-पळत आॅफिस बस पकडावी आणि आत पाय ठेवावा तर सगळी जनता खिडकी पकडून शेजारच्या सिटवर बॅग ठेउन मस्त झोपलेली असते.खरंच झोपतात की नाही माहित नाही पण बसायला जागा हवी म्हणून उठवलं तरी ढिम्म हलत नाहीत.

बरं ठीके तुम्हाला नाही द्यायची जागा ओके पण खिडकी तरी उघडी ठेऊ शकतात ना..ते पण नाही!! बसचं दार बंद, सगळ्या खिडक्या बंद आणि बसमधे ४० माणसं निदान सगळ्यांना प्राणवायू मिळेल इतका वारा तर आत येऊ देत!! पण हा विचार करेल कोण??

एकतर शेवटचा स्टाॅप असल्यामुळे जागा धड मिळत नाही त्यातही खिडकी बंद असा संताप येतो ना X-( पण काय करणार सकाळी सकाळी उगाच चिडचिड करण्यात काय अर्थ म्हणून गप्प बसावं लागतं X-(

आजपण काही वेगळी परिस्थिती नव्हती पण मी ठरवलं होतं काहीही झालं तरी पुढच्या सिटवर बसायचं.बसमधून आत गेल्या गेल्या माझी तेज नजर एका चांगल्या सिटवर खिळली मी लगेच तिकडे मोर्चा वळवला.अामची (खडूस)एच.आर. तिथे बसली म्हणजे झोपली होती.

३ माणसं आरामात बसू शकतात अशा ठिकाणी ही एक बाई आणि बाकी सगळं तिचं सामान बसलं होतं.माझ्या डोक्यात तिडीक गेली वाटलं तिचं सामान उचलून बाहेर फेकून द्यावं पण मी पडले एक निष्पाप,साधी-सरळ एम्पाॅली आणि ती आमची 'एच.आर.'!! अशी गोची असल्यामुळे तसं करायला माझे हात धजावले नाहीत :(

मग तिला हाक मारून जागं करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करून बघितला पण छे!

शेवटी थरथरत्या हाताने मी तिच्या दोन्ही बॅग्स उचलून वर ठेऊन दिल्या आणि तिच्यापासून थोडं लांब पण व्यवस्थित बसले :)

त्या क्षणी अख्ख जग जिंकल्याचा आनंद झाला मला,आजवर कोणी जे करू शकलं नव्हतं ते आज मी करुन दाखवलं होतं, यशस्वीपणे :) :) :)

आज पाहिल्यांदाच मला इतक्या पुढच्या रांगेत बसायला मिळालं होतं नाहीतर बहुतेक वेळा असंच होतं की अगदी शेवटच्या रांगेत जागा मिळते आणि बसल्यापासून जो डिस्को-डान्स चालू होतो तो पार आॅफिसपर्यंत! महानगरपालिकेने केलेले महान रस्ते आणि आमच्या बसचा 'मायकेल शुमाकर' चालक यांच्या कृपेने हा व्यायाम आम्हाला घडतो :-/

पण आज मात्र काहीतरी वेगळं घडत होतं आणि ह्याच आनंदात मी अगदी सुखात आॅफिसला पोहोचले.

Wednesday, August 5, 2015

आराधना


काल 'आराधना' बघितला..पहिल्यांदा :)

प्रत्येक प्रसंग, संवाद, शर्मिला टागोरचा इनोसंट चेहरा, तिचा आय मेक-अप, गुलाबी गुलाबी गालांचा राजेश खन्ना :) :) सगळंच किती नाजूक सालस सभ्य :) कुठेही कोणत्याच हावभावांचा अतिरेक नाही अगदी शर्मिला टागोरवर झालेला अतिप्रसंगही!!

आताच्या काळातले सिनेमे बघून असेल कदाचित पण मला प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की हिरोइनवर प्रत्येक माणूस हात साफ करायचा प्रयत्न करणार पण तसा एकच प्रसंग होता आणि तोही अगदी सभ्यपणे दाखवलेला..अगदी हिरोइनचा पदरही ढळू न-देता,खूप कौतुक वाटलं ते बघून :)

आरडा-ओरडा नाही,उगाचच जड संवाद नाही,भडक रंग नाहीत..डोळ्याला आणि मनालाही कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही इतका छान सिनेमा.

हिरोइनचे वडील मरतात तो प्रसंग किंवा ती गर्भार असतांनाचं एकाकीपण..सगळी सगळी गोष्टच फार नाजुकतेने हाताळळेली अाहे..हॅट्स आॅफ टू दी व्होल टीम आॅफ आराधना :) :)

Sunday, August 2, 2015

मुहूर्त

आज फ्रेंडशिप डे आहे.सकाळपासून मला पुष्कळ मेसेजेस आले, तुम्हाला पण आले असतील नं..तर एक मजा म्हणून हा दिवस साजरा करायला काहीच हरकत नाही,नाहीतरी सेलेब्रेट करायला आपल्याला हल्ली कोणतंही कारण चालतं काय..
शाळेत असतांना खुप धमाल यायची ह्या दिवशी :) सगळ्या मैत्रिणी एकमेकींना फ्रेंडशिप बॅंण्डस बांधायचो.कधी स्वत: बनवलेले असायचे तर कधी विकत आणलेले..
हा रविवार संपल्यानंतर कोणाच्या हातावर किती दिवस किती बॅंण्डस टिकतात ह्याची पण नोंद ठेवली जायची :)

साधारण १०वी नंतर ब-याच जणींचे मार्ग वेगळे झाले..पुढे मग करियर, लग्न आपसुक ह्या गोष्टी घडत राहिल्या पण फेसबुकने सगळ्यांना एकत्र आणलं :) :)

खरं तर सच्च्या मित्राला असं सांगावं नाही लागत की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस ते..एकमेकांना ते व्यवस्थित माहित असतं आणि मग वर्ष वर्ष जरी भेट नाही झाली तरी एखाद्या वादळी रात्री फक्त एका 'हॅलो' मधे तिला/त्याला सगळं कळून जातं..
मग लटका राग बाहेर पडतो..एकमेकांची खिल्ली उडवली जाते..
शाळा-कॉलेजच्या-आॅफिसच्या दिवसांधले खमंग किस्से बाहेर येतात..भौतिक अंतर पुसल्या जातं आणि जणू एकमेकांसमोर बसून गप्पा चालू आहेत ह्या अावेशात किती वेळ निघून जातो कळत पण नाही..
काही वेळाने गप्पांचा पूर ओसरला की 'ह्या वेळेस नक्की भेटू',असं वचन एकमेकांना देत फोन ठेवला जातो..
ह्या एका फोनमुळे पुढचे कित्येक महिने पुरेल इतकी उर्जा मनाला मिळते आणि प्रत्यक्ष भेट ...तशीच राहून जाते.. :)

असा मित्र/मैत्रिण तुम्हाला असेल नं..आणि कित्येक दिवसात फोनपण झाला नसेल..मग आज नक्की बोला मुहूर्त चांगला आहे :) :) :)

Happy friendships day 2 allll

Thursday, July 30, 2015

अविस्मरणीय भेट


आज दोन वर्षांनी मी मुंबईत आले आणि त्याला भेटायची तीव्र इच्छा झाली.

पण आॅफिसच्या कामाला लगेच जुंपून घ्यावं लागलं..तरी अधुन मधून वेळ मिळाला की त्याची आठवण डोकं वर काढत होती...

२००८ साली आमची ख-या अर्थाने ओळख झाली नरीमन पाॅईंटला..आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला वेळ नाही लागला...

मला नाही माहित त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही पण मी मात्र त्याच्यासाठी वेडी झाले..पण तो लबाड नेहमीच मला एखाद्या प्रियकरासारखा भेटत राहिला...

वर्षामागून वर्ष सरत होती, आमच्या भेटी-गाठी घडत होत्या आणि अचानक मला मुंबई सोडायचा निर्णय घ्यावा लागला पण जातांना भेट पण होउ नाही शकली

त्यामुळेच की काय ह्यावेळेस फारच हुरहूर वाटत होती..

सकाळी आॅफिसला जाण्याआधी भेटावं म्हटलं तर तो आधीच निघून गेलेला असणार आणि संध्याकाळी भेटावं म्हटलं तर त्याला निघायला कदाचित उशीर होत असणार..

काय करावं ह्या विचारांमधे असतांनाच मी आज जरा लवकर आॅफिसबाहेर पडले आणि...आणि तो समोरून आला..घोंघावणा-या वा-यावर स्वार होऊन आला..

विजांच्या लखलखाटात त्याचं सहस्त्रधारांनी नटलेलं रुप मी बघतचं राहिले.

आमच्या पहिल्या भेटीत जसा रौद्र पण मोहक होता अगदी तसाच आजही होता..

इतक्या वर्षांपासून राहिलेली भेट आज जणू पूर्ण करायला.. फक्त मला भेटायला आला होता तो..

माझा प्रियकरच जणू मला सहस्रधारांनी कवेत घ्यायला आला होता..

मधल्या काळात राहिलेल्या सगळ्या गप्पा आम्ही दोघांनी हातात हात घालून नाचत-बागडत पूर्ण केल्या :) :) खूप खूप मज्जा केली आणि परत असंच लवकर भेटायचं ठरवून एकमेकांना अलविदा केलं 😊

Sunday, July 26, 2015

Speechless

Discussion of a 7 years old boy ( my nephew Shaurya ) and his mother regarding movie 'Ba****** bhai****'

Shaurya's Mother : baby, let's go for Ba****** bh******, it's a nice movie.

Shaurya : no mom I don't want to watch that movie.

Shaurya's Mother : 'surprised' but why sweety? You like sal***** kh*** movies ya?

Shaurya : Nop! Not anymore!! He is a criminal!! He killed a man and a deer. I hate him, his movies and even songs!!!

Shaurya's Mother : 'Speechless'

7 years old boy understands what our country's great judiciary system couldn't and set him free...
to make us disbelief in our own judiciary system...

to make proud those people who can easily buy 'even law' with their moneypower...

to make us shameless not to react such big things and still go and watch that cri*****'s movie and applaud for earning records for his movies!!!

In all his movies he was shown as a perfect, ideal, super human being...his character was potrayed larger than life...

in real life he does charity through b***** hu****...but at the time of his own crimecase in the court he behaved like coward!!

If he is really a man like any of his movie character then he should surrender himself to judiciory system!!

Please share if you agree..


I completey support my pilu and proud of him

Monday, May 11, 2015

शेवग्याच्या शेंगा

मराठी रंगभूमीवर आलेलं हे नविन नाटक. कालच ह्याचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे बघायचा योग आला.

गजेंद्र अहिरे लिखित, दिग्दर्शित असलेल्या ह्या नाटकामधे स्वाती चिटणीस, संजय मोने असे मराठी रंगभूमी,चित्रपटसृष्टीतले कसलेले दिग्गज कलाकार आहेत सोबतच हरहुन्नरी अतिशा नाईक आणि इतर कलाकार आहेत.

आयुष्यामधे असलेला एकटेपणा आणि नात्यांमधे असलेली पोकळी ह्या विषयाभोवती हे नाटक गुंफलेलं आहे.
एकमेकांशेजारी राहणा-या चार जणांच्या आयुष्यामधे घडणा-या गोष्टींचं चित्रण आपल्यासमोर उभं केलेलं आहे.साठीच्या वयातले दोघे, चाळीशीच्या वयातली एक बाई आणि एक तरूणी अशी मुख्य चार पात्र ह्यामधे आहेत.

कादंबरी कदम ... हं ती मंगलाष्टक वन्समोअर मधे मुक्ता बर्वेची जी मैत्रिण दाखवली आहे ना ती.. तर तिला नाटकाचा सुत्रधार बनवलं आहे. गोष्ट सांगायला ती सुरूवात करते आणि एकेका व्यक्तीच्या आयुष्यातले पदर उलगडत जातात.

मला कादंबरी कदमची ह्या कामासाठी केलेली निवड नाही पटली.म्हणजे तिने जे यंग,एनर्जेटीक मुलीचं कॅरेक्टर उभं केलं आहे, त्याकरता कदाचित ती आत्ता त्या वयाची आहे म्हणून तिची निवड योग्य ठरेल पण अभिनयाच्या बाबतीत ती थोडी कमी पडते असं मला वाटलं.अभिनय म्हणजे फक्त वेगवेगळ्या लयीत बोलणं पुरेसं नाही ना, त्यासोबत तुमचा चेहरा, तुमचे डोळेही बोलले पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर,प्लास्टिक चेह-याच्या दिपिका पडूकोण सारखी ती ह्या नाटकामधे मला वाटली. आणि तिला नाटकाच्या सूत्रधाराची भूमिका बजावतांना बघितल्यावर पण अंमळ वाईटच वाटलं.असो.

तर संजय मोने सर, क्या बात है! त्यांच्याविषयी, त्यांच्या अभिनयाविषयी मी पामर काय बोलणार! साठीच्या वयातला रिटायर झालेला एक साधा, सरळमार्गी चालणारा माणूस, त्याची बायको काही वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे म्हणून कायम स्वतःच्या कोषात राहणारा असा मि.सुधीर ससाणे इतका अप्रतिमपणे सादर केला आहे की आपण बघतच राहतो. म्हणजे त्या व्यक्तिरेखेच्या चालण्यापासून ते बोलण्याच्या लकबीपर्यंत अगदी बारीकातल्या बारीक गोष्टींवर त्यांनी काम केलं आहे. संजय मोने सरांना नाटकामधे काम करतांना बघणं ही एक पर्वणी आहे असं मला वाटतं. 'ह्म तो तेरे आशिक है' नंतर म्हणजे जवळपास ७-८वर्षांनी ते व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत आणि त्यांच्या ह्या एकाच रोलने तो सगळा गॅप भरून काढला आहे, हॅट्स ऑफ टू संजय मोने सर.

बाकी सरप्राईज इलेमेंट वाटणारी दुसरी व्यक्ति म्हणजे अतिशा नाईक! हो व्यक्तीच कारण त्यांनी नाटकामधे ज्याप्रमाणे व्यक्तीरेखा सादर केली आहे त्याला तोड नाही. आजवर मी त्यांना फक्त 'फू बाई फू' आणि 'झी अ‍ॅवॉर्ड्स' मधेच कुठल्यातरी पांचट स्कीटमधे बघितलं आहे! कुठेही अतिशयोक्ती न-करता अगदी योग्य तितकंच हसून आणि तेही योग्य पट्टीत त्यांनी अशी काही भूमिका रंगवली आहे ना खरंच लाजवाब!

स्वाती चिटणीस ह्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ह्या नाटकाला पूर्णत्व प्राप्त करून दिलं आहे.दिसायला त्या सुंदर आहेतच पण अभिनय आणि इतर कलाकारांसोबत एकूणच स्टेजवरचा त्यांचा वावर इतका सहज आणि सुखद आहे की मजा येते :) त्यांची वेशभुषा सुध्दा अगदी छान रंगसंगतीतली आहे त्यामुळे नाटक अजूनच खुलून आल्यासारखं वाटतं.

सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे सर. नाटकाचं लेखन, त्यात असलेली दोन गाणी, प्रत्येक वाक्य, एकूणच नाटकाचा पूर्ण फ्लो इतका सहज पण अर्थपूर्ण आहे की एक प्रेक्षक म्हणून आपल्याला एक अप्रतीम नाटक बघितल्याच समाधान मिळतं.नाटकामधे टाळ्या घेणारी वाक्यं किंवा हशा पिकवणारी वाक्यं अजिबात नाहीत पण अंतर्मूख करणारी वाक्य नक्कीच आहेत. नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ह्यांचं नातं, त्यातले बारकावे, त्यातले रूसवे-फुगवे आणि आयुष्यामधे घडणा-या घटनांचा नात्यावर आणि त्या-त्या व्यक्तींवर होणारा परिणाम उत्कृष्ठरित्या दाखवला आहे.

'घंटा रिकामी लोलक गायब' हे एक वाक्य ह्या नाटकातून वापरण्यात आलं आहे.कोणतंही एक्सप्रेशन ह्या वाक्यातून सादर करता येतं इतकं चपखल ते कलाकारांच्या तोंडात बसवलं आहे!

खूप दिवसांनी इतक्या छान नाटकाचा अनुभव घेता आला,ह्या नाटकाच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि गजेंद्र अहिरे सरांना एकच विनंती की त्यांनी मराठी चित्रपटांसारखीच मराठी रंगभूमीवरही अशीच वैविध्यपूर्ण नाटकं अजून आणावीत.


Wednesday, April 15, 2015

शो-पिस

हल्ली दुचाकीच्या अ‍ॅक्सेसरीजमधे एका गोष्टीची भर पडली आहे. रस्त्यावरून जातांना तुम्हाला दिसलच असेल ते शोपिस.लक्षात नाही आलं? अहो शिरस्त्राण किंवा हेल्मेट लावलेलं असतं बघा बाईकला शेवटच्या चाकाच्या थोडं वर. हां तेच ते शोपिस!

बहुतेक करून सिग्नलला उभं असतांना किंवा रस्त्यावरून जातांनासुध्दा बहुतांश गाड्या अशा दिसतात ज्यांना हेल्मेट लटकवलेलं असतं. म्हणजे ज्याची जागा दुचाकीस्वाराच्या डोक्यावर असायला हवी ती गोष्ट गाडीला लटकवून हिंडतात लोकं. पुण्यामधे तर ब-याचदा हेल्मेटसक्तीचा प्रयत्न करण्यात आला आहे पण नियम आणि पुण्यामधे..वेगळाच विषय आहे तो..

तर हिंजेवाडी मधे असणा-या बहुतेक सर्व आय.टी. कंपन्यांनी आणि पुणे शहरातल्या ब-याच कॉलेज आणि कंपन्यांनी दुचाकीस्वारांना शिस्त लावायचा एक छोटासा प्रयत्न केला. जर तुम्ही दुचाकीने ऑफिसला येत आहात तर तुमच्या डोक्यावर शिरस्त्राण आवश्यक आहे असा नियम आहे. जर शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट नसेल तर तुम्हाला तुमची दुचाकी ऑफिस पार्किंगमधे लावता येत नाही.

पण गम्मत अशी आहे की, हे दुचाकीस्वार इतके हुशार आहेत की, घरून निघतांना हेल्मेट गाडीला लॉक करतात आणि ऑफिसजवळ आलं की मग परिधान करून गेटमधून आत येतात. ऑफिसमधून बाहेर पडतांना डोक्यावर नुसतं अडकवतात आणि बाहेर गेल्या गेल्या हातामधे घेऊन आगेकूच करतात.

अरे कंपनीवाले काय वेडे आहेत का तुम्हाला हेल्मेट घालायची सक्ती करायला! तुमची काळजी तुम्ही स्वतः घेत नाही म्हणून कंपनी ते करायचा प्रयत्न करते पण, त्याचीही अडचण कशी वाटू शकते लोकांना (हेल्मेट न-घालणा-या)??

तुम्ही म्हणाल, नुसते शब्द लिहणं सोपं आहे पण हेल्मेट चा काय त्रास असतो ते घालणा-यालच माहित!
हम्म मला चांगलच माहित आहे की हेल्मेट घातल्याने काय काय त्रास होऊ शकतात पण ते त्रास रोजच्या वापरानंतर अंगवळणी पडतात असाही माझा अनुभव आहे. त्यामुळेच जेंव्हा असे दुचाकीला लटकवलेले हेल्मेट्स दिसतात ना तेंव्हा चीड येते त्या लोकांची!

रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी वेगवेगळ्या जाहिरातींमधून हेल्मेट वापराचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला आहे. नुकतीच एक नविन जाहिरात आली आहे इंडियन हेडइंजुरी फाउंडेशन संस्थेकडून ज्यामधे, पुराणकाळातले देव कसे शिरस्त्राण वापरत होते हे दाखवून 'आता तरी हेल्मेट घाला रे बाबांनो' अशी जणू विनवणी करण्यात आली आहे.

अगदी लाखाच्या घरातल्या बाईक्स वापरायला जर मजा वाटते तर मग हेल्मेट्स का नाही वापरू शकत बाईकस्वार, लाज वाटते की काय? अर्थात साधी काही हजारांच्या घरातली सिटी-बाईक वापरण्या-या माणसांना सुध्दा हा नियम लागू होतो!

मला तर ना असं वाटतं की मुन्नाभाईच्या स्टाईलमधे अशा सगळ्या लोकांना एक कार्ड द्यावं ज्यावर लिहीलेलं असेल,'धन्यवाद हेल्मेटचा वापर न-केल्याबद्दल!तुमचं अगदी स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावरसुध्दा अजिबात प्रेम नाही. तुमच्यासारख्या निस्वार्थी लोकांची खूप गरज आहे देवाला!!'

आणि त्याचबरोबर जे लोक नेहमी हेल्मेट वापरतात त्यांना एक कार्ड द्यावं,'धन्यवाद हेल्मेटचा वापर केल्याबद्दल! तुमचं स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे :)'

Tuesday, March 24, 2015

वेळ

मला ना एक वाईट सवय आहे! बाहेर कुठेही गेल्यावर मला आजूबाजूला बसलेल्या लोकांचं निरिक्षण करायला फार आवडतं.

परवा असंच झालं, आम्ही दोघे एका हॉटेलमधे जेवायला गेलो होतो.जेवायची ऑर्डर देऊन झाल्यावर माझं निरीक्षण चालू झालं. रविवार संध्याकाळ असल्यामुळे हॉटेलमधे व्यवस्थित गर्दी होती.वेटरची लगबग चालू होती आणि जवळपास सगळेचजण आपापसात गप्पा मारण्यात मश्गूल होते.

आमच्या शेजारच्या टेबलवर माझं लक्ष गेलं तेंव्हा, तिथे तिनजण बसलेले दिसले. त्यापैकी एक छोटा मुलगा होता साधारण ३-४ वर्षांचा असेल अगदी गोड होता दिसायला :), त्याच्याशेजारी कदाचित त्याची आई बसलेली असावी आणि त्या बाईसमोर एक पुरूष बसलेला होता.

ती बाई आणि तो पुरूष एकमेकांशी गप्पा मारत होते आणि अशा रितीने बोलत-हसत होते की ते एखादं यंग कॉलेजगोयिंग कपल आहे, त्यांचं नुकतंच सूत जुळलं आहे आणि ते एकमेकांमधे हरवून गेलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचं त्यांना काही घेण-देणं नाहीये आणि मुख्य म्हणजे एक लहान मुलगा आपल्या बाजूला बसलेला आहे ह्याचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.

तो छोटा मुलगा अगदी केविलवाण्या नजरेने सारखा त्या दोघांकडे बघत होता..पण त्या दोघांचं खरंच लक्ष नव्हतं!!
अगदी बोअर होऊन तो नुसता समोर ठेवलेल्या पेल्यातलं पाणी पित बसला होता आणि स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता. इतक्यात माझी आणि त्याची नजरानजर झाली आणि मी त्याच्याकडे बघून हसले पण त्याने साशंक नजरेने बघत तोंड दुसरीकडे फिरवलं.

थोड्यावेळाने त्या कुटुंबाने(?) मागवलेला एक पदार्थ आला. मग त्या बाईने त्या छोट्या मुलाला सांगितलं की हातात काट्याचा चमचा घेऊन कसं खायचं ते आणि ती स्वतःचे फोटो काढण्यात मग्न झाली. त्या मुलाने एक किंवा दोनच घास खाऊन चमचा खाली ठेऊन दिला, त्याचं पोट भरलं होतं की त्याला आवडलं नाही माहित नाही पण, त्याच्यासोबत असणा-या त्या दोघांनाही त्याला विचारलं नाही की त्याला भरवायचा प्रयत्न केला नाही!

थोड्यावेळाने मुख्य जेवण आलं आणि त्यासोबत आईस-टी आला.त्या मुलाच्या खाण्याबाबत मगाशचीच गोष्ट घडली.फरक इतकाच की त्याने आईस-टी पूर्ण संपवला.मलाच इतकं विचित्र वाटत होतं ना ते सगळं बघून!

कदाचित त्या छोट्या मुलाने हॉटेलमधे येण्याआधी काहितरी खाल्लं असेल म्हणून त्याची आई त्याला भरवत नव्हती की जेवण करण्याबद्दल आग्रह धरत नव्हती, खरं काय होतं माहित नाही. पण, ज्या पध्दतीने ते दोघेही त्या लहानग्याकडे दुर्लक्ष करत होते ते मला अजिबात पटलं नाही.

ह्या सगळ्या प्रसंगाकडे बघत असतांनाच मागे अजून एक दृश्य दिसत होतं..असंच तिघांचं एक कुटूंब जेवण करत होतं.आई तिच्या २वर्षाच्या मुलीला कडेवर सांभाळत जेवण करत होती, तिला भरवत होती, तिच्याशी बोलत होती. आणि ती मुलगी सुध्दा अगदी आनंदाने सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देत होती.

दोन अगदी विरूध्द प्रसंग एकाच ठिकाणी घडतांना मी बघितले.

माझ्या मते, पहिल्या प्रसंगामधे जी बाई आहे ती नोकरी करणारी असावी आणि 'आय.टी.' मधे काम करणारी असावी जिला स्वतःच्या नव-यासोबत वेळ घालवायचा होता आणि स्वतःला पण वेळ द्यायचा होता.आणि मुलाला कदाचित जास्त वेळ तीच सांभाळत असेल तिच्या ऑफिसनंतर म्हणून आता हॉटेलमधे आल्यावर ती मुलाकडे लक्षही देत नव्हती!

याऊलट दुस-या प्रसंगामधे जी आई आहे ती कदाचित नोकरी करणारी नसावी, मुलीला सांभाळण्याचा तिला कंटाळा येत नसावा..तिचं पूर्ण विश्व फक्त तिची मुलगी असावी..

माहित नाही खरं काय ते ..पण मी मात्र खूप विचारात पडले..एकदा वाटलं त्या बाईने स्वतःला थोडा वेळ दिला तर काय चूक आहे त्यात? सारखं दुस-यासाठीच दिवसातले २४ तास मोजायचे का - मग तो मुलगा असो वा नवरा! पण मग असंही वाटलं की जर तिच्या लहान मुलाला तिने आत्ता वेळ नाही दिला तर कदाचित पुढे वेळ निघूनही गेलेली असेल!

दोनही प्रसंगांमधली कोणती आई बरोबर वागत होती आणि कोणती चूक माहित नाही पण, मला तरी असं वाटलं की, स्वतःच्या मुलांना शक्यतो जास्त वेळ द्यायला हवा. हल्ली नोकरीच्या निमित्ताने जसे दोघेही बाहेर असतात तसेच मुलंही शाळा-पाळणाघर-ट्युशन्स ह्यामधे व्यस्त असतात.ह्यामुळेच त्यांना आपल्या वेळेची आणि कदाचित त्यांच्यापेक्षा आपल्याला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याची खरी गरज निर्माण झाली आहे..

Friday, March 13, 2015

ओएमजी - ओह माय गुगल!

आजच्या टाईम्स मधे एक धक्कादायक बातमी वाचली
IITian who killed family fearing AIDS tests negative

गुगल..गुगल..गुगल!!! आयआयटी मधून शिकलेला माणूस सुद्धा नीट विचार करू शकला नाही आणि गुगल च्या नादाने काय करून बसला!!

म्हटलं तर गुगल चा काही दोष नाही ह्या घटनेमधे पण आज जी टेक्नॉलॉजी आपल्या हातात इतक्या सहजपणे खेळतीये तिचे दुष्परिणाम इतके भयंकर असू शकतात!!

'वेबबेड' म्हणून एक मालिका एम.टीव्ही या चॅनेलवर दाखवली जाते. त्यातही अशाच काही लोकांच्या कथा दाखवल्या जातात जे टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचा किंवा
दुस-याचा जीव धोक्यात घालतात!!

हल्ली खुपच सोपं झालंय ना आपल्यासाठी, हातामधे ३जी मोबाईल असतो, काहीही अडलं की गुगल करा आणि उत्तर मिळवा.

कुठल्याही गोष्टीबाबत कुतूहल वाटणं साहजिक आहे पण, ते कुतूहल शमवण्यासाठी किंवा त्याबाबतीत माहिती मिळविण्यासाठी आपण जे स्त्रोत वापरतो ये कितपत योग्य आहेत आणि मिळालेली
माहिती कितपत 'खरी' आहे याची शहानिशा करतो का?

उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू ची प्रचंड साथ चालू आहे आपल्या भागामधे. ह्याबाबत काळजी कशी घ्यावी पासून ते होमिओपॅथीचं कोणतं औषध घ्यावं, कोणतं
फळ जास्त प्रमाणात खावं इतपर्यंत सर्व माहिती व्हॉट्स अ‍ॅपवरून किंवा फेसबुकवरून सर्सास इकडे-तिकडे पाठवली जात आहे. पण त्यात कितपत तथ्य आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

साधारणपणे आपल्याला जेंव्हा काही त्रास व्हायला लागतो म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप येणे, शरीर जेंव्हा काही वेगळी लक्षणं दाखवायला लागतं तेंव्हा आपण सहसा लगेच डॉक्टर कडे जात
नाही, मेडीकल वाल्याकडे जाऊन गोळ्या घेऊन येतो किंवा घरी असलेल्या गोळ्या घेऊन काम भागवतो.

पण, हल्ली असंही होत आहे की, काहीही झालं की आधी गुगलबाबाला विचारायचं, विशेषतः जी मुलं-मुली एकटी राहतात किंवा शिक्षणानिमित्त, कामानिमित्त घरापासून दूर राहतात त्यांच्यामधे
गुगलला विचारण्याकडे कल जास्त दिसतो.
हां तर मग गुगलबाबाकडून जे उत्तर मिळेल, समजेल किंवा आवडेल तो पर्याय निवडायचा आणि त्यानुसार पुढचं पाऊल उचलायचं.जर ती मात्रा लागू पडली नाही तरच मग डॉक्टरकडे जायचं! तिथे गेल्यावरही डॉक्टरला आपण 'गुगल'च्या कृपेने मिळविलेल्या ज्ञानाचा पाढा वाचून दाखवायचा आणि स्वतःच स्वतःच्या रोगाचं निदान सांगायचं!

आणि इथेच तर सगळी गम्मत घडत आहे! माहितीचा प्रचंड साठा असणा-या गुगल ला हे कळत नाही की कोणती माहिती खरीच 'खरी' आहे किंवा नाही. माहिती पुरवणं इतकंच त्याचं काम आहे पण तिचा उपयोग कसा आणि कुठे आणि किती प्रमाणात करायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं!

गुगलमधे जी माहिती मिळते ती तुमच्या-आमच्यासारखीच माणसं लिहून साठवतात. प्रत्येकवेळेस मूळ स्त्रोताचा संदर्भ दिलेला असतोच असं नाही त्यामुळे, डोळे उघडे ठेउन माहिती वाचा आणि शक्यतो खात्री करून घेऊन मगच तिचा उपयोग करा.


Thursday, February 26, 2015

शिक्षा

सोमवारी संध्याकाळी थोरात उद्यानात चक्कर मारावी म्हणून गेले..गेटमधून आत गेल्यावर डाव्या हाताला महादेवाचं मंदीर आहे आणि पुढे बाकी देवि-देवतांचं मंदीर आहे.

सोमवार म्हणून आपसूक पाय महादेवाच्या मंदीराकडे वळले.विशेष गर्दी नव्हती पण तरी दोन-तीन जण उभे होते.
महादेवाची पुजा अगदी छान मांडलेली होती,शिवलिंगावर एक पांढरं फुल त्याखाली बेलाचं पान आणि बाकी पिंड अगदी काळीशार स्वच्छ, प्रसन्न वाटलं ते बघून :)

नमस्कार करून मी निघत असतांनाच एक बाई लगबगीने पुढे आल्या.लगेचच त्यांनी हातातली चितळेंच्या गाईच्या दुधाची पिशवी फोडून महादेवावर धार धरली.काही क्षणांपूर्वीपर्यंत जिथे अगदी
सुंदर पूजा मांडलेली होती तिथे आता दुधाचा अभिषेक होऊन सगळंच विचित्र झालं होतं!

बिचारा महादेव! आतापर्यंत डोक्यावरच्या बेला-फुलाच्या मंदसुगंधामधे ध्यानस्थ बसलेला असतांना अचानक गार दुधाची धार पडल्यावर एकदम भांबावलाच असेल!!

मला ते बघून असं वाटलं त्या बाईचा हात धरावा आणि तिला विचारावं सुंदर साडी घालून मेक-अप करून तयार झाल्यावर डोक्यावर कोणी पाणी ओतलं तर कसं वाटेल?? का त्या बिचा-या
देवाला त्रास देत आहेस!!

पण माझ्या मनामधे हा संवाद होईतो ती बाई महादेवाच्या पुजेचं होत्याचं नव्हतं करून समोरच्या मंदिरातल्या देवांकडे वळली पण होती!

देव असण्याची कदाचित शिक्षाच मिळाली आज महादेवाला!!