Monday, November 16, 2009

कुठे तरी हे थांबायला हवं...

माझ्या आई, बाबांच्या लहानपणी जर कोणी बीडि ओढताना दिसलं तर मोठे लोक समजावून सांगत की ही सवय किती वाईट आहे ते!! ते जसे मोठे झाले तसं काहिंनी बीडि, सिगरेट ओढुन बघितली, त्यात त्यांना आनंद वाटला आणि त्यांची ती सवय बनली!

आताच्या काळात तर सर्रास धुम्रपान करतात लोकं, त्यात कॉलेज मधे जाणार्‍या मुलांचं आणि मुलींचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे.. दुर्दैवाने शाळेतली मुलं सुद्धा त्याच वळणावर जात आहेत..

सिगरेट का ओढायची ह्याचं बहुतेकांना कारण पण माहीत नसेल..

कोणासाठी ती फॅशन आहे..कोणासाठी तो टाईमपास आहे.. कोणासाठी, ती सवय, डोक्याचा ताण कमी करायचं साधन आहे..मात्र जास्तीत जास्त लोकांची आज ती गरज बनलीए..

आधी उत्सुकता म्हणून सिगरेट ओढुन बघितली जाते आणि मग तिचं सवईत रुपांतर कधी होतं ते त्या व्यक्तीला पण कळत नाही..

सगळे जन कानी-कपाळी ओरडून सांगत असतात की smoking is injurious to health..पण काही फरक पडत नाही..उलट ती सवय असणार्याच्यां अश्या प्रतिक्रिया असतात की, एका दिवशी तर वरती जायचच आहे ना मग एक दिवस अजुन कमी झाला तर काय फरक पडणार आहे!!

मैत्रीण,आई,बायको किंव्हा सगळ्यात जवळच्या व्यक्तीने किती जरी सामजाउन सांगितलं तरी जास्तीत जास्त थोडे दिवस ह्या लोकांची सवय बंद होते पण कायमची नाही!!

आजकाल मुली सगळ्याच क्षेत्रात मुलांसोबत खांद्याला खांदा लाउन लढतायेत, मग स्मोकिंग
च्या फील्ड मधे कश्या काय मागे राहतील!! गेल्याच महिन्यात रीडर'स डाइजेस्ट मधे
भारतातलं मुलींचं स्मोकिंग चं प्रमाण वाढल्याचा वाचलं..

जे लोक स्मोक करतात त्यांना स्वत:ची काळजी नसतेच पण दुसर्‍याची पण नसते..passive smoking is dangerous than active smoking!!

गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर ला एक नवा फतवा निघाला की, सार्वजनिक ठिकाणी जर धूम्रपान केलं तर दंड होईल..
पण आपल्या इथे प्रत्येक नियमाचे जसे 3-13 वाजतात तसंच ह्या पण नियमाचं झालं..
नियम निघाल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून त्याला धाब्यावर बसवल गेलं..
पाट्या लावल्या गेल्या सगळ्या ऑफिसेस, माल्स, हॉटेल्स मधे पण त्यानेही धूम्रपान करणार्‍या व्यक्तींना कुठे रोख बसला नाही..

एक बाळबोध विचार असा येतो मनामधे की, सरकार तंबाखूच्या पदार्थांवर बंदी का नाही आणत..
त्याच्या विक्रीतून जितका पैसा मिळतो तो एका बाजूला खूप जास्त असेल पण तरुण, कर्तुत्ववान पिढीचं त्याच्यामुळे होणार नुकसान त्या बदल्यात किती तरी पटीने जास्त आहे!!

पण हे सगळं कुठेतरी थांबायलं हवं!!

ज्या व्यक्तिंना व्यसन आहे त्यांनी कुठेतरी हा विचार करायला हवा की, क्षणिक सुखाच्या आहारी जाउन पूर्ण आयुष्य वाया घालवण्यात काही अर्थ नाही, यापेक्षा स्वत:वर जर थोडा ताबा ठेवला तर कदाचीत अश्या व्यसनांपासून सहज मुक्तता मिळू शकते.

देव अश्या लोकांना नीट विचार करण्याची बुद्धि देवो इतकीच आशा आपण ठेउ शकतो.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check