Monday, September 16, 2013

'नवरा' एक खोज - भाग ८

रविवारचा प्रसंग झाल्यानंतर मी स्वतःशी परत एकदा बोलायचा प्रयत्न केला.बाबा म्हटले त्याप्रमाणे मला खरंच माहित होतं का कसा पार्टनर हवा आहे ते! आतापर्यंत भेटलेल्या मुलांपैकी मला कोणीच आवडला नव्हता असं का?मला परत एकदा विचार करायची गरज होती,स्वत:ला विचारायची गरज होती.काहितरी चुकत होतं का?की अजून काही वेगळं कारण होतं Sorry 2

माझा ऑफ झालेला मूड बघून आई म्हटली,'जेंव्हा तुझ्या नशिबात असेल तेंव्हाच सापडेल तो. उगाच इकडे-तिकडे डोकं आपटून काय होणार!'
तर ताई परत एकदा समजावत म्हटली की, 'इतकं काही तुझं वय झालं नाही,असेल तुझ्यासाठी नक्कीच कोणीतरी.ते म्हणतात ना,स्वर्गात गाठी बांधलेल्या असतात तो समोर आला की तेरे दिमाग मे घंटी जरूर बजेगी' आणि तेवढ्यात माझा भाऊ त्यामधे अॅड करत म्हटला,'आणि हो तुझ्या आजूबाजूला अचानक व्हायोलिनचे सूर वाजू लागतील..सगळीकडे अगदी प्रकाश भरून उरेल आणि पांढ-याशुभ्र घोड्यावर बसून तो राजकुमार तुला घ्यायला येईल'.. आणि फस्स करून आम्ही सगळे हसत सुटलो Biggrin

माझ्या मनावरचं मळभ थोडंतरी दूर झालं पण बाबांनी मात्र मनाशी एक विचार पक्का केला.माझी पत्रिका कुठल्यातरी भटजीला दाखवायची.बाबांनी एकदा मनावर घेतलं की मग ते कोणाचंच ऐकत नाहीत त्या दबंगच्या चुलबुल पांडेसारखं Mosking

तर बाबांनी लगेच एका भटजीला माझी पत्रिका दाखवली आणि माझ्या लग्नामधे उशीर का होत आहे ह्याचा उलगडा झाला. त्या भटजींनी सांगितलं की मुलीच्या लग्नघरात राहू आणि केतूचा वास असल्या कारणाने तिच्या लग्नामधे विलंब होत आहे. ह्यावर उपाय एकच! तिची नक्षत्रशींती करून घ्या, माझ्याकडे केलीत तर डिस्काऊंट मधे करून देईन अथवा तुम्ही दुसरा भटजी शोधू शकता Yes 3

माझ्या पत्रिकेमधे इतका गोंधळ सुरू असेल अशी कोणालाच कल्पना नव्हती.ह्याचा परिणाम असा झाला की सगळे मला म्हटले, बाळ तुझी काही चूक नाही जर आतापर्यंत कोणी आवडला नसेल तर, तुझ्या पत्रिकेमधेच प्रॉब्लेम आहे.तू काळजी नको करूस आपण काहीतरी उपाययोजना नक्की करू Biggrin

मला एक गोष्ट कळेना, आपल्या ग्रहमालेमधे राहू-केतू नामक कोणताच ग्रह / लघुग्रह / मानवी उपग्रह नाही मग हे दोन पठ्ठे माझ्या पत्रिकेमधे आले कुठून Unknw बरं ते जरी असले वरती आकाशामधे बसलेले तरी त्यांचा माझ्यावर इथे पृथ्वीवर ते पण डायरेक्ट पत्रिकेमधे कसा काय परिणाम होऊ शकतो  Shok आणि जर ती नक्षत्रशांती वगैरे केली तरी त्यांच्या डोक्यावर खरंच अक्षता पडतील, त्यांना दिलेला नैवेद्या चाखून ते खरंच माझ्या लग्नाला संमती देतील Scratch one-s head

काय यार आजच्या जमान्यामधे अजूनही ह्या गोष्टी का पाळल्या जातातNea
मी तर सरळ विरोध दर्शवला आणि स्पष्ट सांगितलं घरच्यांना मी अशी कोणतीही पूजा करून घ्यायला तयार नाही पण शेवटी ते माझे जन्मदाते ना, इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडून त्यांनी हे कर्मकांड करवून घेतलंच Dash 1

त्यांच्या दबावाला बळी पडून मी पूजा तर करवून घेतली पण आता मला बघायचंच होतं की भटजींनी दिलेल्या डेडलाईन मधे माझं लग्न होतं की नाही Aggressive

भटजींच्या मते नक्षत्रशांतीची पुजा त्यांनी इतकी पावरफुल्ल बांधली होती की एक महिन्यामधे माझं लग्न झालंच पाहिजे नाहीतर दक्षिणा परत!

घरच्यांना ते ऐकून कोण आनंद झाला पण आतापर्यंत आलेल्या अनुभवामुळे म्हणा किंवा मला कदाचित भविष्य जणू कळालं म्हणा माझा आतला आवाज कुत्सितपणे हसून म्हटला,'शक्यच नाही, एक महिन्यात काय पुढच्या निदान चार महिन्यांमधे तरी हे होणार नाही.आत्ताच त्या ब्राम्हणाला म्हणावं की दक्षिणा बाजूला काढून ठेव मी परत घ्यायला येईन I-m so happy

बाकी भटजींनी केलेल्या त्या आकाशवाणीमुळे माझ्या बाबांनी 'वर'संशोधन डब्बल-स्पीडने सुरू केलं.
पण काही दिवसांतच मला ऑफिसमधे सांगण्यात आलं की,मला तब्बल सहा महिन्यांकरता परदेशी जावं लागणार आहे Yahoo,हे ऐकलं आणि माझ्या अंतर्मनाने टाळी दिली वर डॉयलॉगही मारला,'बघ मी म्हटलं होतं ना Diablo

मी घरी आल्यावर ही बातमी ऐकवली आणि सगळं घर एकदम खुश झालं.परदेशी जाण्याची संधी इतकी अलगद चालून आल्यामुळे मी तर हवेत तरंगतच होते.पंधरा दिवसांतच मला निघायचं होतं म्हणून मी आणि आई लगेच याद्या करायला बसलो आणि ह्या सगळ्यामधे मी 'वरसंशोधन' वगैरे काही सुरू आहे हे पार विसरून गेले Biggrin

1 comment:

  1. Parents win at the end, I had to take Sick Leave from office for this Grah-shanti!!

    ReplyDelete